महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर- कळसूबाई
कळसुबाई …… पश्चिम घाटातील सर्वोच्च शिखर . जैवविविधतेने परिपूर्ण असलेल्या अतूट , अभेद्य अशा सह्याद्री पर्वताची शान . अर्थातच महाराष्ट्राचे एव्हरेस्ट . पर्वतराजीत उगम पावणारे धबधबे आणि तो स्वर्गाची अनुभूती देणारा निसर्गसौंदर्याचा अद्भुत नजराणा .. पराकोटीचे नयनसुख . अशा ठिकाणी पावसाळ्यात भेट देणे म्हणजे पर्वणीच नव्हे का? समुद्रसपाटीपासून 1 ,646 मीटर उंचीवर असलेले हे शिखर अहमदनगरमधील अकोला आणि नाशिकमधील इगतपुरी यांच्या सीमेवर वसलेले आहे . या भागात प्रामुख्याने बेसॉल्ट खडक आणि जांभी मृदा आढळून येते . पायथ्याशी असणाऱ्या बारी गावातून शिखराकडे वाटचाल करावी लागते . या गावच्या ग्रामपंचायतीने वाहनांसाठी पार्किंगची सोय केलेली आहे . गावातून थोडेसे चालत गेल्यानंतर...